या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मूळचा जिंतूर तालुक्यातील असलेला शुभम हा पुण्याला नोकरी करीत होता. तिथेच त्याची शुभांगीशी ओळख झाली. २०१७ साली त्यांनी आर्यसमाज पद्धतीने प्रेमविवाह केला. कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध प्रेम विवाह केल्याने त्यांनी पुणे सोडले अन औरंगाबादेत आले. गेल्या तीन वर्षांपासून ते शहरातील संजयनगर गल्ली क्र-३ मध्ये भाड्याने रूम घेऊन राहत होते.
पुढे कोरोना काळात त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यानंतरही शुभमला नोकरी मिळाली नाही. मित्रांकडून पैसे घेऊन तो कसेबसे घराचा गाडा हाकत होता. या काळात शुभम निराशेच्या गर्तेत गेला. शुभांगी मात्र त्याला धीर देत होती. कर्जाच्या वाढत्या तणावाने तो सिगरेट आणि दारूच्या आहारी गेला. वाढत्या कर्जाने शुभम तणावाखाली राहत होता.
