केंद्रातल्या भाजप सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांगली भाजपाच्या वतीने जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व कोल्हापूरचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदासाठी दगाबाज करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांनी दिली आहे. आता राष्ट्रपतीपदाचा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल, त्यानंतर पश्चिम बंगाल मधीलही सरकार बरखास्त होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकच सरकार बरखास्त केले आहे. मात्र आता महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मधील सरकार शंभर टक्के बरखास्त करतील, असेही हाळवणकर म्हणाले.
