महिलेच्या तक्रारीनुसार अकोल्यातील कपिलानगर गोरक्षण रोड येथील बी.टेक शिक्षण झालेल्या व नोकरीला असलेल्या युवतीचा विवाह नागपूर येथील खडगाव रोड लावा येथील मयुर मोहन ठाकरे याच्याशी झाला होता. लग्नामध्ये पती व सासु- सासरे यांच्या मागणीनुसार साडेसात लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम दिली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आतेसासू सुरेखा काशीनाथ इंगळे हिने घरातील सर्व लोकांसमोर तू नाकाची नथ आणली नाही. तुझ्या बापाने तुला विकले असे म्हणून विवाहितेचा अपमान केला होता.
पतीकडून दारू पिवून पैशांचा तगादा
विवाहितेच्या पतीला दारूचे (Crime) व्यसन होते. त्यामुळे रोज दारू पिऊन घरी यायचा आणि या त्याच्या कारचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावायचा. त्यानुसार विवाहितेच्या वडिलांनी त्याला 89 हजार रूपये ऑनलाइन पाठवले होते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्याने ते आणखी पैशांची मागणी करीत होते. आणखी पैसे घेऊन ये. त्यासाठी नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करायचे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती मयुर मोहन ठाकरे, सासरे मोहन दशरथ ठाकरे, सासू सुनिता मोहन ठाकरे, दीर मकरंद मोहन ठाकरे, रेखा उर्फ सुरेखा काशीनाथ इंगळे, गणेश काशीनाथ इंगळे, डॉ. हृदयनाथ मार्कड, रामदास थोटे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
