ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी संशयित 2 वर्षांनी गजाआड

फुले शाहू आंबेडकर
0
पिंपळनेर : जेबापूर (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरारी असलेले सरपंच व ग्रामसेवकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. जेबापूर (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीत १ एप्रिल २०१६ ते १७ जुलै २०१९ पर्यंत तत्कालीन सरपंच जगन्नाथ रामसिंग मालचे (रा. जेबापूर) व तत्कालीन ग्रामसेवक अनिल ऊर्फ बबल्या विश्वास सोनवणे यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगामार्फत मंजूर झालेल्या रकमेतून १३ लाख ३३ हजार रुपये, पेसा निधीतून बारा लाख २७ हजार रुपये, ग्रामनिधीतून ५६ हजार ५५० रुपये, जैवविविधा निधीतून १९ हजार ५०० रुपये असा एकूण २६ लाख ३६ हजार ५० रूपये जनतेच्या फायद्यासाठी न वापरता दोघांनी युनियन बँकेच्या पिंपळनेर शाखेतून परस्पर काढून घेतले होते. याप्रकरणी साक्री पंचायत समितीचे तत्कालिन विस्तार अधिकारी अमृत पंडित महाले यांनी १३ ऑगस्ट २०२० ला पिंपळनेर पोलिसांत फिर्याद दिली होती. तेव्हापासून ते दोघे आरोपी फरारी होते. त्यांचा पिंपळनेर पोलिस कसून शोध घेत होते. शेवटी तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी त्यांना शोधून काढले. २२ डिसेंबर २०२२ ला त्यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default