दलित वस्ती योजनेत भ्रष्टाचार; संतप्त नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे शहरातील शंभर टक्के दलित समाजाचा रहिवास असलेल्‍या परिसरात दलित वस्ती सुधार योजनेचा निधी गेला कुठे? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत. यामुळे आज प्रभागातील नागरीकांनी मनपावर धडक मोर्चा काढला. यावेळी संताप्त नागरिकांतर्फे  धुळे महापालिकेच्या प्रवेशव्दारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राज्य सरकार समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकास योजना तयार करत असतात. त्यात अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना असून  धुळे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधील सिध्दार्थनगर, नवजीवननगर, देशमुखनगर, भिमनगर, शनीनगर या भागात शंभर टक्के दलित समाजाचे रहिवाशी आहेत. तरी देखील शासनाच्या अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेचा लाभ दिला गेला नसल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

आयुक्‍तांना दिले निवेदन

धुळे शहरातील फाशीपुल जवळील सिध्दार्थनगर येथून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा हळूहळू मार्गस्थ होत मनपावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी प्रवेशव्दारावर ठिय्या देखील दिला. तसेच मनपा आयुक्तांना या संदर्भात मोर्चेकरांतर्फे निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default