गोरगरिबांना बसतोय फटका...
घाटीत येणाऱ्या रूग्णांमध्ये बहुतांश रुग्ण सर्वसामान्य कुटुंबातील असतात. तर अनेक गोरगरीब उपचारासाठी औरंगाबादसह मराठवाड्यातून येत असतात. त्यामुळे त्यांच्याजवळ मोजकेच पैसे असतात. अशात चोरटे त्यांचा खिसा साफ करत आहे. त्यामुळे अनेकदा पैसे चोरीला गेल्यावर औषध आणण्यासाठी देखील रूग्णांच्या नातेवाईकांकडे पैसे उरत नाही. तर मोबाईल देखील मोठ्याप्रमाणावर चोरीला जात असल्याने याचाही मोठा फटका रूग्णांच्या नातेवाईकांना बसत आहे. तर बऱ्याचदा रूग्णांना पाहण्यासाठी आलेल्या नातेवाईकांच्या दुचाकी देखील चोरीला जात आहे. त्यामुळे याचा देखील मोठा आर्थिक फटका त्यांना बसत आहे.
पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी...
घाटी परिसरात दिवसरात्र नशेखोरांचा वावर असतो. हे चोरटे असून ते नशेत गरिब लोकांना धमकावून लुटमार करतात. तसेच अनेकदा हे नशेखोर आपसात वाद घालुन भांडणे करतांना दिसतात. त्यानंतर मार खाणारा हे पोलिस चौकीत तक्रार करण्यासाठी येतात. मात्र हे प्रकार नेहमीचे असल्याने पोलिस त्यांना ठाण्यात पाठवितात. दरम्यान काही दिवसांपुर्वीच या नशेखोरीतून घाटीजवळ दोघांचा खुन करण्यात आला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून, तशी मागणी होत आहे.
