पुण्यात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली. पण आता या घटनेत मोठी माहिती समोर आली आहे. इंजिनीअर तरुणाने सर्वांच्या जेवणात विष कालवून कुटुंब संपवल्याचं सांगण्यात येत आहे. हे कुटुंब मुळचं दर्यापूरमधील रविदास नगर येथील होते. वर्षभरापूर्वीच हे कुटुंब पुण्यात आलं होतं. आणि मुंढवामध्ये रहात होतं.
अमरावती : इंजिनीअर तरुणाने आपल्या शिक्षणासोबत शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. सुरुवातीला बक्कळ नफा कमवला. अनेकांना प्रेरित करून त्यांच्यांकडून पैसेही घेतले. मात्र, बाजारात सातत्याने मंदी येत गेल्याने तो निराशेत गेला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. आई-वडील आणि बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष कालवून संपूर्ण कुटुंबच संपवलं. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातलं हे कुटुंब होतं. ही धक्कादायक घटना घडली पुण्यामध्ये.
जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील रविदास नगर येथील रहिवाशी दीपक थोटे यांच्या कुटुंबाची स्थिती अतिशय गरीबीची होती. त्यांच्याकडे कुठलीही शेती नव्हती. त्यांनी आपल्या मुलाचे शिक्षण दर्यापूर या ठिकाणी पूर्ण केले. व मुलाला इंजीनिअर बनवले. आणि एक मुलगी ही शिक्षण घेत होती.
मुलगा ऋषिकेश थोटे हा इंजिनीअर झाल्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. त्यामध्ये त्याला आधी नफा मिळत गेला. त्या नफ्यातून ऋषिकेशने आपले घर हे दर्यापूर येथे बांधले आणि काही दिवसात ऋषिकेश हा शेतीसुद्धा घेणार होता. ऋषिकेशला वारंवार शेअर मार्केटमध्ये नफा दिसत होता. त्याने दर्यापूर शहरातील कित्येक लोकांपासून पैसा घेतला आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. नंतर ऋषिकेश हा आपल्या कुटुंबाला घेऊन एक वर्षापूर्वी पुण्यात राहण्यासाठी गेला. पुण्यात तो एका खासगी कंपनीमध्ये कामही करत होता.
मुलगा ऋषिकेश थोटे हा इंजिनीअर झाल्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला. त्यामध्ये त्याला आधी नफा मिळत गेला. त्या नफ्यातून ऋषिकेशने आपले घर हे दर्यापूर येथे बांधले आणि काही दिवसात ऋषिकेश हा शेतीसुद्धा घेणार होता. ऋषिकेशला वारंवार शेअर मार्केटमध्ये नफा दिसत होता. त्याने दर्यापूर शहरातील कित्येक लोकांपासून पैसा घेतला आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. नंतर ऋषिकेश हा आपल्या कुटुंबाला घेऊन एक वर्षापूर्वी पुण्यात राहण्यासाठी गेला. पुण्यात तो एका खासगी कंपनीमध्ये कामही करत होता.
ऋषिकेशने शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र शेअर मार्केटमध्ये मंदी आल्याने ऋषिकेश थोटे हा पूर्णतः हवालदिन झाला होता. लोकांपासून लाखो रुपये घेतल्याने पैसा आता कसा परत करावा? या चिंतेत ऋषिकेश होता. पण या संकटातून बाहेर पडण्याऐवजी त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्याने जेवणात विष कालवलं. आपल्या कुटुंबातील आई-वडील आणि लहान बहिणीच्या जेवणातही विष कालवलं. या घटनेत थोटे कुटुंबातील चारही सदस्यांचा धक्कादायक मृत्यू झाला. सदरच्या घटनेची माहिती दर्यापूर येथे कळली. त्यांचे जवळचे नातेवाई आणि कुटुंबात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वांवर पुण्यातच अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.
