धक्कादायक! माहेराहून साहित्य आणण्यासाठी सासरच्यांकडून छळ; विवाहितेने संपवले आयुष्य

फुले शाहू आंबेडकर
0
लग्नात जीवनावश्यक साहित्य दिले नसल्याच्या कारणावरून सतत होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी औसा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे 

याबाबत अधिक माहिती अशी की, रोहिणी हर्षद पाटोळे या विवाहितेला पती हर्षद पाटोळे, सासरा बालाजी पाटोळे, सासू विजयमाला पाटोळे आणि दीर रजनीकांत पाटोळे हे मानसिक त्रास देत होते. तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नात भांडे, पलंग, कपडे व संसारउपयोगी वस्तू काहीच दिल्या नाहीत, असे म्हणत तिला हिणवत होते.

पाडव्याच्या सणाला माहेरी जात असतानाही "रोहिणीला घेऊन जायचे असेल तर परत आणताना तिच्यासोबत संसार उपयोगी साहित्य गादी पलंग देणार असाल तर घेऊन जा अन्यथा घेऊन जाऊ नका," असे तिच्या सासरच्या मंडळींनी सुणावले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default