याबाबत अधिक माहिती अशी की, रोहिणी हर्षद पाटोळे या विवाहितेला पती हर्षद पाटोळे, सासरा बालाजी पाटोळे, सासू विजयमाला पाटोळे आणि दीर रजनीकांत पाटोळे हे मानसिक त्रास देत होते. तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नात भांडे, पलंग, कपडे व संसारउपयोगी वस्तू काहीच दिल्या नाहीत, असे म्हणत तिला हिणवत होते.
पाडव्याच्या सणाला माहेरी जात असतानाही "रोहिणीला घेऊन जायचे असेल तर परत आणताना तिच्यासोबत संसार उपयोगी साहित्य गादी पलंग देणार असाल तर घेऊन जा अन्यथा घेऊन जाऊ नका," असे तिच्या सासरच्या मंडळींनी सुणावले होते.
