येथे राहणारे विनय कुमार पाल यांचा डिसेंबर महिन्यात एक टेम्पो रस्त्यावरून चोरी गेला होता. या संदर्भात त्यांनी काशिमीरा पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्यावरून पोलीस अंदाज ही बांधला नसेल की त्यांच्या हाती असे काही लागेल. पण पाल यांच्या टेम्पोच्या तपासात पोलिसांच्या हाती एक आरोपी लागला. त्याच्याकडून पोलिसांना या मागे मोठी टोळी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी १४ पोलीसांचे पथक तयार केले. हे पथक राजस्थान, गुजरात हरियाणा राज्यात तपासाला रवाना केले.
फास्टटॅगवरून पुढचे धागेदोरे
तपासात चोरी गेलेल्या एका ट्रकवरील टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या फास्टटॅगची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचे तांत्रिक विश्लेषण करत राजस्थानमधील मेवात गावातून फारुख खान आणि मुबीन हारीस याला अटक केली. त्यांनी देशभरातून ५३ ट्रक चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
