याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल सुरेश जगताप (वय ३२) याने काल सकाळी केंजळ येथील भट नावाच्या शिवारातील वेताळबा ओढ्यातील वडाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब गावातील अनिकेत जगताप यांच्या निदर्शनास आली. त्याने लागलीच कुटुंबीयांना व पोलिस पाटील यांना कळविले.
त्यानंतर पोलिसांनी मृतदेह खाली सोडवून कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. राहुल यांचे १२ जूनला लग्न होते. त्यासाठी त्याने भुईंज पोलिस ठाण्यात बँडचा रीतसर परवाना घेतला होता.
