माझ्या बहिणीचा नाद सोड नाहीतर..., आधी भावाची तरुणाला ताकीद, नंतर घडलं धक्कादायक कृत्य

फुले शाहू आंबेडकर
0
जळगावात वादातून चौघांनी तरुणावर गोळीबार केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

जळगाव: शहरातील मेहरूण परिसरात मुलीच्या वादातून तरूणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडला होता. या गुन्ह्यातील दोन फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (१८) हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. त्याच परिसरात राहणारा दिक्षांत उर्फ दादू सपकाळे याच्यासोबत वाद झाले होते. त्यांच्यातील वाद मिटल्यानंतर देखील दिक्षांत हा सोहमला नेहमी खून्नस देऊन पाहत होता.
शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता सोहम हा त्याच्या मित्रांसोबत मेहरूण येथील श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा होता. यावेळी दोन दुचाकीवर चार जण त्याठिकाणी आले. त्यातील एका दुचाकीवर दिक्षांत सपकाळे, गोपाल चौधरी तर दुसऱ्या दुचाकीवर दोन अनोळखी इसम होते. चौघांनी सोहमला शिवीगाळ केली. याचा जाब विचारताच दिक्षांतने पुन्हा शिवीगाळ करत तु माझ्या बहिणीचा नाद सोडला नाही, थांब तुझा मुडदा पाडतो असे म्हणत सोहमवर गोळीबार केला. त्यानंतर चौघे दुचाकीवरून पसार झाले. या गोळीबारमध्ये कुणाला काहीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. हल्लखोर पसार झाल्याने दोन पथके त्यांच्या शोधार्थ रवाना केली होती. हल्लेखार संशयित दिक्षांत उर्फ दादू सपकाळे हा साथीदारांसह धुळे येथील देवपूर येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २ मार्च रोजी सकाळी १० वाजता संशयित दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (२०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) आणि गोपाल सिताराम चौधरी (२१, रा. रामेश्र्वर कॉलनी) या दोघांना अटक केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेकॉ किरण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, छगन तायडे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे यांच्या पथकाने केली. जळगांव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीने चांगले डोके वर काढले आहे. किरकोळ कारणावरून चाकू हल्ला, गोळीबार करणे, खून अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे जळगाव शहर हिटलिस्टवर आलेले दिसून येत आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने दररोज बंदूक, कट्टे, तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपींवर करवाई होत आहे. मात्र तरी पोलिसांना न जुमानता गुन्हेगारी वृत्ती वाढत जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default