घरातून लग्नाला नकार, प्रेमी युगुलानं घर सोडलं, सगळीकडे शोधाशोध, नंतर पोलिसांच्या कृतीनं सगळ्यांचं मन जिंकलं

फुले शाहू आंबेडकर
0
रामगीरमधून पळून गेलेल्या प्रेमी युगुलाचं पोलीस ठाण्यात लग्न लावून दिलं आहे. यामुळे परिसरात चर्चा होत आहे. वाचा नेमकं प्रकरण...
लातूर: शहरातील स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या रामगीर नगरातून पळून गेलेल्या प्रेयसीचे तिच्याच प्रियकरासोबत पोलीस ठाण्यातच शुभमंगल उरकण्यात आले आहे. ३० एप्रिल रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यांतर्गत हरवलेल्या मुलीचे वडील लाला केरबा कांबळे (४५) यांच्या फिर्यादीवरून दाखल मिसिंग नं २३/२०२४ गुन्हाप्रमाणे १ मे रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल आर डी जाधव यांनी तपास करुन मुलीला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या मुलीचे नाव स्नेहा लाला कांबळे (२०) असे आहे. ती स्वखुशीने एकमेकांवर प्रेम असलेल्या अनिकेत निवृत्ती मस्के (२२) या मुलासोबत गेल्याचे समजले. यावरून मुलीच्या आई-वडिलांना समक्ष विचारपूस केली असता मुलीच्या आई वडिलांनी लग्नास सहमती दर्शवली. मात्र हे लग्न पोलिसांसमक्ष पोलीस ठाण्यातच पार पडावे, असा आग्रह धरला. मुलीचे मामा आणि मुलाचे मामा यांच्या विनंतीवरून पोलीस निरीक्षक वैजिनाथ मुंढे यांच्या मार्गदर्शनात स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यातच शुभमंगल उरकला आहे. यावेळी मुलीच्या मामाने मणीमंगळसुत्र, जोडवे, पैंजण, नवीन कपडे, साडी फुलांचे हार आणले होते. तर मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत उपस्थित नातेवाईकांच्या साक्षीने हे लग्न पार पडले.
काही दिवसांपासून मुलगा आणि मुलगी दोघे पळून जाऊन लग्न केल्याची माहिती आई-वडिलांना मिळाली होती. ही माहिती विवेकानंद पोलीस ठाण्यात मुंडे यांना समजतात त्यांनी दोघांना वापस बोलून घेऊन मुलामुलीच्या आई वडिलांच्या समोर विवाह लावून दिला. पोलिसांनी आई-वडिलांची भूमिका पार पाडत समाजात अशा घटना पुन्हा वारंवार घडू नयेत, यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी हा प्रकार केल्यास मुंडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default