आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
उल्हासनगर : फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी रोख रक्कम नेणाऱ्या व्यापाऱ्याकडून ८५ हजारांची खंडणी उकळणाऱ्या उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकातील पाच जणांविरूद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडल्यानंतर याप्रकरणी १३ दिवसांनंतर ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू होता की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आरोपींमध्ये तीन उल्हासनगर महापालिका कर्मचारी आणि दोन पोलिसांचा सहभाग आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default