काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला होता. अशाच प्रकारे गुन्ह्याच्या तपासाचे कारण पुढे करून, टोपण नावे वापरून संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचेही फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे.
दोन महिने फोन टॅपिंग
संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन जवळपास दोन महिने टॅपिंगसाठी लावण्यात आले होते. २०१९मध्ये दोघांचेही फोन टॅप करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 'राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूने' हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप गुन्ह्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे.
संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन जवळपास दोन महिने टॅपिंगसाठी लावण्यात आले होते. २०१९मध्ये दोघांचेही फोन टॅप करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 'राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूने' हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप गुन्ह्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे.
