मुंबई : सर्वसामांन्यांना अतिशय कमी दरात शिधादुकानातून अन्नधान्य पुरवलं जातं. तसेच मोफत अन्नाधान्यही दिलं जातं. कोणीही उपाशीपोटी झोपू नये, कोणाचीही उपासमार होऊ नये, या उद्देशाने शासनाकडून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. मात्र काही जण याचा गैरफायदा घेतात. मोफत मिळणाऱ्या अन्नधान्यासाठी अपात्र असेलले रेशन कार्डधारकही याचा गैरफायदा घेत अन्नधान्य घेतात. आता अशा फुकट्या रेशन कार्डधारकांविरोधात शासनाने मोठं पाऊल उचललं आहे
मोफत मिळणाऱ्या अन्नधान्यासाठी अपात्र असणाऱ्या रेशन कार्डधारकांना सरकारने इशारा दिला आहे. मोफत अन्नधान्य लाटणाऱ्या अपात्र शिधाधारकांना रेशन कार्ड सरेंडर करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच रेशन कार्ड सरेंडर न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाऊ शकते.
