मुख्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंगकर यांनी निवडणुकीची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.या निवडणुकीसाठी मतदान १८ ऑगस्टला मतदान आणि १९ ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे.ही निवडणूक ओबीसी आरक्षणाविना होईल का यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
त्यात राज्यात आता नुकतंच नवीन शिंदे-फडणवीस सरकार आलं आहे. त्यामुळे या सरकार समोरही हे आव्हान असणार आहे.या निवडणूका जाहीर झाल्यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्न सुटल्याशिवाय निवडणुका नकोत, असं राजकीय पक्ष आणि ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आम्ही ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेणार नाही अशी ग्वाही दिली होती. पण आता चित्र वेगळं आहे. राज्यात ठाकरे सरकार जाऊन आता शिंदे आणि फडणवीस सरकार आलं आहे. आणि नवं सरकार स्थापन झाल्या झाल्याच जवळपास ९२ नगरपालिका आणि नगर पांचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.नगरपंचायत अन् नगपरिषदेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहे का असा प्रश्न विचारला जातोय.
