ठाणेपाडा येथे आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला निधी दिला होता. मात्र विहीर खोदण्यासाठी पाणी पुरवठा विभागाला जागा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे बरेच महिने तो निधी पडून होता. मात्र त्यानंतर प्रशासनाने तो निधी शासनाकडे परत पाठविला. मात्र जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या दप्तरी तो निधी विहीर खोदण्यासाठी खर्ची दाखविला गेला होता. मागील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा बैठकीत विहीर गेली कुठे ? असा प्रश्न सदस्य देवमन पवार यांनी उचलला होता. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी श्री. बाविस्कर साऱ्यांचे टार्गेट ठरले होते.
निधी शासनाला परत
बैठकीत काही सदस्यांनी विहीर सापडली का? उपरोधिक प्रश्न विचारला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत चौकशी करीत तो संबंधित विभागाचा कारकुनची चूक असल्याचे निर्दशनास आणले. तो निधी शासनाला परत गेल्याचे सांगितले. त्यामुळे अखेर चोरीस गेलेली विहीर गवसल्याने या विषयावर पडदा पडला.
