गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या मराठवाड्स-तीस' घोटाळ्यातील गची ैऐयादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. यातील मुख्य आरोपी संतोष राठोड अजूनही हर्सूल कारागृहात असून, त्याला जामीन मिळत नाही. तर दुसरीकडे राठोड बाहेर आल्यावर आपले पैसे मिळतील अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना लागली आहे. भक्कम परताव्याच्या मोहातून लोकांनी कोट्यवधी रुपये या योजनेत गुंतवले होते. या मोहात फक्त सर्वसामान्यच नाही तर पोलीस, शिक्षक, राजकारणी, वाळू व्यावसायिक आणि शासकीय कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा वाचले नाही.
शेतकरी मोठ्याप्रमाणावर अडचणीत...
तीस-तीस योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांमध्ये शेतकऱ्यांचा मोठा समावेश आहे. अनेकांनी शासकीय योजनेत जमीन गेल्यानंतर मिळालेला मोबदला या योजनेत गुंतवला होता. मात्र आता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर काही लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर काही जण आपले पैसे परत येतील अशी अपेक्षा लावून बसले आहेत.
पैशासाठी थेट अपहरण...
तीस-तीस घोटाळ्याचा एकूण आकडा तीनशे कोटीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता मुख्य आरोपी कारागृहात असल्याने मध्यस्थी करणाऱ्यांना गुंतवणूकदार पैसे मागत आहे. अशाच एका तीस-तीस घोटाळ्याच्या व्यवहारातून तीन दिवसांपूर्वी एकाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेत अपहरण झालेल्या व्यक्तीची पुण्यातून सुटका केली.
