तीन महिन्यापूर्वीच्या भांडणाचा राग, गल्लीतील तरुणाचे महिलेसोबत भयंकर कृत्य

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : यावल तालुक्यातील चितोडा येथील ३५ वर्षीय तरुणाच्या हत्येच्या प्रकरणास पाच दिवस उलटत नाही तोच महिलेच्या हत्येच्या घटनेने यावल शहरात खळबळ उडाली असल्याचे दिसून आले आहे. जुन्या भांडणाच्या वादातून महिलेवर कुऱ्हाडीने वार करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास यावल शहरातील काजीपुरा भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. नाजीया खलील काजी ( वय ३५, रा. काजीपुरा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर जावेद युनूस पटेल (रा. काजीवाडा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.नाजीया खलील काजी या कुटुंबासह यावल शहरातील काजीपुरा भागात राहत होत्या. तीन महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून काजीपुरा भागातच राहणाऱ्या जावेद युनूस पटेल याने नाजीया हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात नाजीया गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी नाजीयाला शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत असताना तिचा मृत्यू झाला. यावल येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषीत केले आहे
.पोलिसांनी हत्येप्रकरणी संशयित जावेद युनूस पटेल या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयत नाजीया हिचे पती खलील काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची शहरात चर्चा सुरू होती. पण त्यास पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default