जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये २ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारक असून ११ लाख ३६ हजार ८३६ लाभार्थी आहे. या सर्व लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे स्वस्त धान्याचे दर महिन्याला वितरण केले जाते
कोरोनाकाळापासून प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांनाच नियमित धान्यासोबतच पाच किलो मोफतचे धान्य देण्यास सुरुवात झाली. प्रारंभी पाच किलो तांदूळ मोफत दिले जायचे.परंतु लाभार्थ्यांकडून तांदळाचीc साठवणूक करून त्याची विक्री करण्याचे प्रकार समोर आल्यानंतर शासनाने दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ देण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक किलो गहू व चार किलो तांदूळ दिले जात आहे.
आता या मोफतच्या धान्य वितरणाकरिता आणखी डिसेंबर महिन्यापर्यंत शासनाने मुदतवाढ दिलीअसून याचा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. मोफतच्या धान्यामध्ये पुन्हा तांदळाचेच वितरण अधिक असल्याने यापेक्षा गहू देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.
