कोण आहे ही कोयता गॅंग?
फिर्यादी हे मित्रांसोबत घोरपडे पेठेत थांबले होते. आरोपी योगेश चव्हाण यांनी त्यांना शिवीगाळ करत तुम्ही बघेल तेव्हा कॉलनीत का येता असा जाब विचारला. त्यावेळी फिर्यादी यांनी ''तू कोण विचारणारा'', असे म्हणाल्याने दोघात वाद झाले. ''तू कॉलनीमध्ये आला आहेस, पण परत जिवंत जाणार नाहीस'', असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर तीन दुचाकीवरून बाईक वरून (Bike) आपल्या मित्रांना घेऊन आला आणि कोयत्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
फिर्यादी हे घोरपडे पेठेतून जीवाच्या आकांताने पळत होते. आरोपी त्यांना मारण्यासाठी हातात कोयते आणि शस्त्र घेऊन त्यांचा पाठलाग करत होते. जीव वाचवण्यासाठी फिर्यादी एका बिल्डिंगमध्ये लपून बसले. आरोपींनी त्या ठिकाणीही जाऊन ''तुला आज जिवंत ठेवणार नाही'', असे बोलून कोयत्याने त्यांच्यावर वार केले तर दुसऱ्या एका आरोपीने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. सध्या या प्रकारानं आजूबाजूच्या परिसरात खळबळ माजली आहे. सध्या अशाच काही घटना पुण्यात वाढू लागल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच सिंहगड येथे एका मुलानं दादागिरी करत पिस्तूल दाखवत फुकट काजूकतली खाण्याचा प्रयत्न केला होता.
योगेश दत्तात्रय चव्हाण (वय 38), सुरज संतोष कोल्हे (वय 19), मुकेश इंद्रजीत उंबरे (वय 19), विशाल अंकुश मुजमुले (वय 19) यांच्यासह आणखी तिघांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार महेश थोरात (वय 22) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
