काय आहे घटना?
दहीदी गावाजवळ बिचकुले यांची शेती आहे. शेतात त्यांचे राहते घर असून, सोमवारी (दि.३०) सकाळी सूमनबाई मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती भास्कर हे शेतमाल विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी भास्कर घरी आल्यावर पत्नी घरी नसल्याने ते शेतात पाहण्यासाठी गेले. तेथे त्या नसल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. शेतात रक्ताने माखलेले फावडे आढळले आणि शेतापासून एक किमी अंतरावरील जंगलात सुमनबाई यांचे शीर, धड, पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे त्यांच्या खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस श्वानपथकासह दाखल झाले होते. रात्री उशिरा मृतदेह मालेगावी आणण्यात आला. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला. सुमनबाई यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, तीन मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.
दहीदी गावाजवळ बिचकुले यांची शेती आहे. शेतात त्यांचे राहते घर असून, सोमवारी (दि.३०) सकाळी सूमनबाई मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती भास्कर हे शेतमाल विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. सायंकाळी भास्कर घरी आल्यावर पत्नी घरी नसल्याने ते शेतात पाहण्यासाठी गेले. तेथे त्या नसल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. शेतात रक्ताने माखलेले फावडे आढळले आणि शेतापासून एक किमी अंतरावरील जंगलात सुमनबाई यांचे शीर, धड, पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अतिशय क्रूरपणे त्यांच्या खून करण्यात आल्याने परिसरातील नागरिक हादरले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस श्वानपथकासह दाखल झाले होते. रात्री उशिरा मृतदेह मालेगावी आणण्यात आला. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला. सुमनबाई यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, तीन मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.
नराधम कोण?
भास्कर बिचकुले शेती करतात. ते चार भावंड असून गावात आणि शेतात त्यांचे घर आहे. शेतातील घरी भास्कर व त्यांच्या पत्नीच राहतात. सोमवारीदेखील ते दोघेच शेतावर होते. पंचक्रोशीत या अमानवी घटनेने नागरिक हादरले आहेत. सुमनबाई यांची पाचही मुले आईच्या मायेला पारखी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नराधम कोण आहे? याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी दहीदीकरांनी केली आहे.
भास्कर बिचकुले शेती करतात. ते चार भावंड असून गावात आणि शेतात त्यांचे घर आहे. शेतातील घरी भास्कर व त्यांच्या पत्नीच राहतात. सोमवारीदेखील ते दोघेच शेतावर होते. पंचक्रोशीत या अमानवी घटनेने नागरिक हादरले आहेत. सुमनबाई यांची पाचही मुले आईच्या मायेला पारखी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नराधम कोण आहे? याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी दहीदीकरांनी केली आहे.
