गीतांजली’ नावानेच व्यवसाय केले बंद
या माध्यमातून गीतांजली कोळी यांनी पदरमोड करून गावोगावी पोहोचून गावातील महिलांना एकत्र करतात. त्या गावात दारूबंदी करण्यासाठी लढा हळूहळू सुरू केला. या लढ्याची ठिणगी हळूहळू संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरू लागली. जिल्हाभरात गीतांजली कोळी या रणरागिणीच्या नावाने अवैध दारू व्यवसाय चालवणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकू लागली आहे. बहुतेक अवैध दारू व्यवसाय चालवणाऱ्यांनी गीतांजली कोळी यांच्या धाकाने आपला व्यवसाय बंद देखील केला आहे.
अन् महिला मदतीसाठी करतात फोन
ज्या गावातून महिलांना अवैध दारूच्या अड्ड्यांमुळे त्रास होतो. त्या महिला गीतांजली कोळी यांना फोन करून गावातील दारूचे अड्डे बंद करण्यासंदर्भात मदत मागतात. त्यावेळी गीतांजली कोळी या आपल्या साथीदार महिला रणरागिणींच्या मदतीने गावात पोहोचून त्या गावातील अवैध दारूचे दुकान पूर्णपणे उध्वस्त करतात. विशेष म्हणजे या कामात राज्य उत्पादन शुल्क विभागाची देखील चांगल्या प्रकारे मदत या महिला रणरागिणींना होत असते.
उध्वस्त झालेले संसार फुलले
आतापर्यंत गीतांजली कोळी यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये संपूर्णतः दारूबंदी झाली असून या गावांमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे उध्वस्त झालेले संसार चांगल्या प्रकारे फुलू लागले आहेत. जोपर्यंत जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होणार नाही, तोपर्यंत आपला लढा असाच अहोरात्र सुरू ठेवणार असल्याचा निर्धार गीतांजली कोळी या महिला रणरागिनीने केला आहे. या लढ्याला त्यांच्या सोबत असलेल्या महिला रागिनींचा या कामात चांगल सहकार्य लाभत आहे.
