२४ एप्रिल या' तारखेपासून पालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम; अतिक्रमणांवर हातोडा पडणार

फुले शाहू आंबेडकर
0
शहरातील वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्‍न खूपच गंभीर झाला आहे. मुख्य रस्त्यांवर तर चालणेही कठीण झाले आहे अशी स्थिती आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात तर नित्याचेच ठरले आहेत.
त्याची दखल नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी घेतली आहे. त्यांनी नागरिकांना आपली अतिक्रमणे २१ एप्रिलपर्यंत काढून घेण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा २४ एप्रिलपासून पालिका प्रशासन अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेणार असल्याचा इशारा दिला आहे.नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांची मुजोरी खूपच वाढली आहे. जेथे जागा दिसेल तेथे रस्त्याचा व वाहतुकीचा विचार न करताच टपऱ्या, ओटे बांधणे, घराच्या पायऱ्या रस्त्यावर बांधणे आदी प्रकारे कच्च्या व पक्क्या अतिक्रमणांचा विळखाच शहरात वाढला आहे
त्यामुळे शहरातील रस्तेच अतिक्रमणामुळे गिळंकृत केले जात आहेत. परिणामी रस्ते अरुंद होऊन वाढत्या वाहतुकीसाठी ते अपुरे पडू लागले आहेत. त्यातूनच वाहतुकीस अडचणीचे ठरून दररोज लहान-मोठे अपघात होत असल्याचे चित्र आहे. याबाबत शहरातील काही संस्था व नागरिकांनी याबाबत नंदुरबार पालिकेकडे तक्रारी केल्याने त्याची दखल प्रशासक तथा पालिकेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी घेतली आहे.अतिक्रमण करणाऱ्यांना प्रथम संधी देत २१ एप्रिलपूर्वी सार्वजनिक ठिकाणे व मुख्य रसत्यांवरील अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावे, असे आवाहन केले आहे. जर ते काढले नाही तर पालिका प्रशासन स्वतः अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेऊन २४ एप्रिलपासून अतिक्रमणे हटविणार आहे. त्यासाठी लागणारा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जाईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default