अवधान एमआयडीसीतील जयदुर्गा इंडस्ट्रीजचे येथे दि.7 मे रोजी साफसफाईचे काम सुरू होते. त्यामुळे सोयाबीनचे 23 कट्टे हे प्लॉटच्या बाहेरील शेडमध्ये ठेवण्यात आले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मालवाहू वाहनातून सोयाबीन भरलेले 63 हजार 250 रूपये किंमतीचे 23 कट्टे लंपास केले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार मोहाडी पोलीस ठाण्याचे सपोनि.भूषण कोते, सपोनि. प्रकाश पाटील, असई.अशोक पायमोडे, पोना. राहुल पाटील, पोकॉ.जितेंद्र वाघ, मुकेश मोरे, बापुजी पाटील, जयकुमार चौधरी यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासाले. त्यात एक संशयित मालवाहू रिक्षा या परिसरातून जाताना दिसली. त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली
गुन्हा रवी यशवंत मालचे (वय 30), करण शांताराम सोनवणे (वय 19), नवनाथ महादू सोनवणे (वय 35) तिघे रा.दिवाणमळा, ता.धुळे, सोमनाथ राजु सोनवणे (वय 30), आकाश सुकदेव ठाकरे (वय 20) दोघे रा.लळींग व दगा रामदास पवार (भिल-26) रा.जुन्नेर, ता.धुळे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून 60 हजार रूपये किंमतीची मालवाहू रिक्षा (क्र.एम.एच.18/बी. एच.0869), 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी (क्र. एम.एच.18/सी.ए.7236) व 41 हजार 250 रूपये किंमतीचे 25 सोयाबिनचे कट्टे असा एकूण 1 लाख 31 हजार 250 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
