पती-पत्नी और वो...; पतीच्या मित्राचं घरी येणं-जाणं, मैत्री झाली अन् प्रेमातून नवऱ्याला संपवलं

फुले शाहू आंबेडकर
0
पती-पत्नी और ओ... अशी एखाद्या गुन्हेगारी चित्रपटाला शोभेल घटना समोर आली आहे. पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात तपास करत पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. आता त्यांचं संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे
बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पातूर पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला होता. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीची त्याच्याच पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं हत्या केल्याचं उघड झालं होतं. ही आत्महत्या असावी असं भासवण्यासाठी पतीचा मृतदेह विहिरीत फेकून दिलं. लोकांना हे कळू नये म्हणून पतीला मारल्यानंतर पत्नीनेच आपला पती बेपत्ता आहे, अशी तक्रार पोलिसात दाखल केली होती. पण काही दिवसांनी आलेल्या एका रिपोर्टने पत्नीचा खेळ खल्लास झाला.
काही दिवसानंतर वैद्यकीय अहवालात आला आणि महिलेच्या पतीची हत्या झाल्याचं समोर आलं अन् नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्यानं प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा हा संपूर्ण कट रचल्याचं उघड झालं. पातूर पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. सात महिन्यांपासून दोघेही कारागृहात होते. आता त्यांना सरकारी खर्चातून वकिलांची मदत देण्यात आल्यानंतर दोन्ही आरोपींची बाजू त्यांनी न्यायालयात मांडली. सुनवाणीनंतर न्यायालयानं आरोपींना जामीन मंजूर केलाय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
संपूर्ण प्रकरण आहे साधारणतः ९ डिसेंबर २०२२ च्या आधीचं. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या आलेगाव येथील शाम खुळे यांच्या कार्ला शेतशिवारातील शेतात बंडू आत्माराम डाखोरे (वय ४५, रा. सावरगाव) नावाचे व्यक्ती हे काम करायचे. अन् तिथेच रखवालदार म्हणून राहायचे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मीरा (वय ३५) देखील राहायची. दरम्यान, ९ डिसेंबरच्या काही दिवसांपूर्वी बंडू हे बेपत्ता झाले. याबाबत त्यांची पत्नी मीरा डाखोरे यांनी पातूर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. बेपत्ता असलेले बंडू यांचा कार्ला शेतशिवारातील विहिरीत सावरगाव इथे म्हणजेच ९ डिसेंबर २०२२ रोजी मृतदेह आढळून आला होता. बंडू यांनी आत्महत्या केली असल्याचं यावेळी प्राथमिक दर्शनी दिसून येत होतं. दरम्यान, वैद्यकीय अहवालात त्या व्यक्तीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी पातूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती गोष्टी उघड होत गेली. पत्नी आणि तिच्या प्रियकरानं संगणमत करून पतीची (बंडू) हत्या केल्याचं उघड झालं.
पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

मृत बंडू डाखोरे अन् त्याची पत्नी मीरा या दोघांचेही गजानन शेरू बावणे या व्यक्तीसोबत चांगले संबध होते. गजाननचे बंडूच्या घरी नेहमी येणं जाणं होतं. त्यातून मीरा आणि गजानन यांची चांगली मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमाची कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच बंडूला लागली होती. त्यातून दोघे पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. अखेर पत्नीनं पतीचा काटा काढण्याचं निश्चित केलं, असं पोलिस तपासात समोर आलं होतं.
गजानन आणि मृत बंडू हे दोघेही हत्येच्या दिवशी सोबत दारू पिण्यासाठी शेतात बसले. यावेळी गजानन याने ओढणीने बंडूचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी, असं भासवून देण्यासाठी बंडूच्या आत्महत्येचा बनाव रचला. ज्या शेतात त्यांची पार्टी सुरू होती, त्याच शेताजवळच्या विहिरीत बंडू यांचा मृतदेह फरफटत नेऊन विहिरित फेकून दिला. अन् आत्महत्या असल्याचं सांगितलं
पतीच्या हत्येनंतर पत्नी मीरानं पातूर पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या शोधात तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना शेजारच्या विहिरीत बेपत्ता असलेल्या त्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. परंतु वैद्यकीय अहवालात सर्व बाब समोर आली. आणि पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरिश गवळी यांनी केलेल्या योग्य तपासानंतर त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचं पितळ उघडं पडलं.
पत्नी आणि प्रियकराला सात महिन्यानंतर जामीन

मारेकरी पत्नी आणि तिचा प्रियकर गजानन बावणे या दोघांविरुद्ध पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. तेव्हापासून दोघेही न्यायालयीन कोठडीत म्हणजेच कारागृहात होते. दोन्ही आरोपींचा लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मुख्य लोक अभिरक्षक एन. एन. उंबरकर यांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झालाय.
दरम्यान, लोकअभिरक्षक कार्यालय हे अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे कार्यान्वित असून इथं फौजदारी प्रकरणांमध्ये गरजू आर्थिक व दुर्बल घटकातील आरोपींना नियुक्त तज्ज्ञ वकिलांमार्फत मोफत सेवा पुरवण्यात येते. यापूर्वीही लोकअभिरक्षक कार्यालयाद्वारे फौजदारी प्रकरणांत अनेक आरोपींनी विधी साहाय्य घेऊन लाभ मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default