धक्कादायक! दुचाकीने बाहेर गेला, पुन्हा घरी परतलाच नाही; ४२ दिवसांनी युवकाचा मृतदेहच सापडला

फुले शाहू आंबेडकर
0
घातपाताच्या संशयातून धडगाव तालुक्यातील खडक्या आणि अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या दोन गावातून दोन वेगवेगळ्या युवतींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईला पाठवल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा आज अक्कलकुवा तालुक्यातील वेरी येथून एका युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठीच मुंबईकडे रवाना करण्यात आला. वेरी गावात मृतदेह हा मिठात पुरला होता. तो तब्बल 42 दिवसांनी बाहेर काढण्यात आला. त्यामुळे सातपुड्यात पुन्हा हत्येच्या घटनांची गंभीर चर्चा होऊ लागली आहे
छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षण घेणारा धडगाव तालुक्यातील वाहवाणी येथील युवक अनिकेत टेड्या वळवी (वय २३) हा डिसेंबर महिन्यात गावदिवाळीनिमित्त गावाकडे आला होता. तो २६ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस ओळखीच्याच एका व्यक्तीसोबत दुचाकीने घराबाहेर गेला, परंतु, तो सकाळपर्यंत परतलाच नव्हता. अखेर कात्रीच्या केलवाणीपाडा भागात त्याचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहाच्या परिस्थितीवरुन त्याचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनिकेतच्या नातेवाईकांना आला. शिवाय दुचाकी सुस्थितीत होती, सोबत गेलेल्या व्यक्तीला कुठलीच दुखापत झाली नाही व तो घटनेनंतर मृताच्या घरी गेलाच नव्हता. त्यामुळे संशयात भर पडली. या संशयापोटी अनिकेतचा मृतदेह त्यांचे हल्लीचे गाव वेरी तालुका अक्कलकुवा येथे मिठात पुरत केल्ला सिंगा वळवी, खेमसिंग सिंगा वळवी, रघुवीरसिंग सिंगा वळवी, दिवान तेजाला वळवी, नवसा बावा पाडवी व सिंगा बावा पाडवी या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला
या घटनेच्या अधिक चौकशीनिमित शवविच्छेदनासाठी मिठात पुरलेला अनिकेतचा मृतदेह जे.जे.रुग्णालय मुंबई येथे हलविण्यात आला आहे. यावेळी शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पवार, अक्कलकुव्याचे प्रभारी तहसीलदार दिलीप गांगुर्डे, धडगावचे पोलीस निरीक्षक पठाण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default