संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न; रामदास आठवले,आंबेडकरी समाज एकत्र यावा

फुले शाहू आंबेडकर
0
यावेळच्या निवडणुकीत आरक्षण, राज्यघटना या सारख्या अनेक मुद्यांवर जनतेत संभ्रम निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला असल्याची कबुली ‘एनडीए’चे घटक असलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांनी दिली आहे. महाराष्ट्रात विजयाचे ‘मार्जिन’ कमी राहील, मात्र तरीही भाजप सत्तेत परतेल असे त्यांनी सांगितले. बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली.
मिळाले नाही?
- माझा पक्ष महायुतीमधील सर्वांत जुना पक्ष आहे. मात्र इतर दोन नवे पक्ष आल्यामुळे आमचा विसर पडला असेच म्हणावे लागेल. यावेळी सोलापूर, शिर्डी या दोन जागा आम्ही मागितल्या होत्या. मी जनतेतून निवडून यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. खरे तर ‘रिपाइं’ला एखादी जागा देणे सहज शक्य होते. मात्र दिली नाही. त्यामुळे कार्यकर्ते, जनतेत नाराजी आहे. मात्र वैयक्तिक नाराजी सोडून मी महायुतीचा प्रचार करत असून पक्ष कार्यकर्त्यांनाही मी प्रचाराला लावले आहे.
महाराष्ट्रात आंबेडकरी पक्षांचा प्रभाव घटत चालला आहे का?
-बाळासाहेब आंबेडकर माझ्यापेक्षा ‘डॅशिंग’ आहेत. मी मवाळ आहे. मात्र ज्यांच्यासोबत जातो, त्यांची भूमिका मांडतो. फटाफट निर्णय घेऊन त्याचा फायदा होत नाही. बाबासाहेबांनी सत्तेत जाण्यास सांगितले होते. एकट्या दलित समाजाच्या भरवशावर ते शक्य नाही. त्यामुळे सत्तेत जाण्यासाठी कुणातरी सोबत जावे लागते.
मुस्लीम आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे?
-धार्मिक आधारावर आरक्षण देता येणार नाही. तसेही ओबीसींच्या यादीत ८० टक्के मुस्लीम समाज आहे. मुस्लिमांना आमचा विरोध नाही. धर्म म्हणून आरक्षण देता येणार नाही. केवळ मुस्लिमांची मते हवीत म्हणून काँग्रेस असा प्रचार करतोय, मात्र ७० वर्षे सत्तेत असताना काँग्रेसने मुस्लिमांना आरक्षण का दिले नाही? हा प्रश्न आहे.
आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. त्याकडे तुम्ही कसे बघता ..
-५० टक्के आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली आहे. काँग्रेसची एवढे वर्षे हाती सत्ता होती. मग राहुल गांधी यांनी आरक्षणाची मर्यादा का वाढवली नाही. दलित-सवर्णांमधील वादाचे कारण आरक्षण आहे, म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या असे म्हणणारा मी पहिला नेता होतो.
पवार, ठाकरेंसोबत तुमचे संबंध कसे आहेत?
- उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासोबत माझा वैयक्तिक वाद नाही. राज्यसभेत असल्यामुळे शरद पवारांसोबत संपर्कात असतो. काँग्रेससोबत अनेक वर्षे सोबत होतो. भाजप-सेना युतीत काही मतभेद झाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या जागी बाळासाहेब असते तर त्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली नसती. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला कित्येकदा फटकारले, अपमान केला मात्र भाजपसोबतची युती तोडली नाही. मात्र उद्धव ठाकरेंना ते वाद मिटविता आले नाहीत.
प्रकाश आंबेडकर हे भाजपची ‘बी टिम’ आहे असा आरोप केला जातो?
-प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी बोलणी करताना काँग्रेसने त्यांचा अपमान केला. काही लोक त्यांना भाजपची ‘बी टिम’ म्हणतात मात्र आजपर्यंत प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण बघता यामध्ये तथ्य नाही. सर्व समाज घटकांना एकत्र आणणे ही त्यांची राजकीय भूमिका आहे. आंबेडकरी समाज एकत्र येत असेल तर मी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default