निवडणूक बंदोबस्तावरुन परतले अन् काहीच वेळात मृत्यू, धुळ्यातील जवान अरुणाचल प्रदेशात शहीद

फुले शाहू आंबेडकर
0
धुळ्यातील एक जवान अरुणाचल प्रदेशात निवडणूक ड्युटीवर गेला होता. तिथे बंदोबस्त आटोपून तो त्याच्या राहण्याच्या ठिकाणी परतला आणि काहीच वेळात त्याची प्रकृती बिघडली.
धुळे: अरुणाचल प्रदेशातील शेरगाव येथील ७३ बटालियन सशस्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीर मरण आलं आहे. कमलेश ज्ञानेश्वर कदम असं या जवानाचं नाव आहे. धुळे जिल्ह्यातील मूळचा गोराणे (तालुका शिंदखेडा) येथील हा जवान होता. १४ मे रोजी दुपारी ३ वाजता त्यांचा मृत्यू झाला. कमलेश हे कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे निवडणूक बंदोबस्तावर होते. कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वीर जवान कमलेश कदम यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चेन्नई ते मुंबई हवाईमार्गाने तसेच मुंबई ते धुळे रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार (महिंदळे, साक्री रोड, ता. जि.धुळे) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमलेश यास वीरमरण आल्याची बातमी काल सायंकाळी येथे पोहोचताच त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली. कमलेश कदम हे सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. नुकतेच ते धुळ्यात आले होते. आठवड्याभरा पूर्वी ते ड्युटीवर गेले होते. मात्र, पाच दिवसात त्यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन जुळी मुलं आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default