शिबिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. १८ जानेवारी रोजी सायंकाळी सरपंच सौ. राधा पारधी व समाजसेवक श्री. राजू मुंबईकर (महाराष्ट्रभूषण) यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रा. विशाल करंजवकर, प्रा. पंकज सरवदे व डॉ. विष्णू भंडारे उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनानंतर, विद्यार्थ्यांनी आपल्या श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, रस्ते डागडुजी, गवत कापणे आणि शून्य प्लास्टिक मोहीम राबवली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांना प्लास्टिक मुक्त गावासाठी आवाहन केले गेले. तसेच, पथनाट्याद्वारे आणि पत्रकांच्या माध्यमातून "स्वच्छ भारत अभियान"ाची जनजागृती केली.
शिबिरात विद्यार्थ्यांनी गावातील शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आणि विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित केली. शिबिराच्या प्रत्येक दिवशी विविध बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये अंधश्रद्धा व बुवाबाजी, व्यसनमुक्ती, तरुणांची अंतर्भूत क्षमता, साप व पर्यावरण अशा महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांवर चर्चा केली गेली.
दुसऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये, दि. २२ जानेवारी रोजी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यात महिलांनी उखाणे घेतले आणि तिळगुळ व भेटवस्तूंचे वाटप केले. यानंतर, 'स्वच्छ गाव स्वच्छ भारत' व 'व्यसनमुक्ती' या विषयांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रा. विशाल करंजवकर आणि सौरभ गुप्ता यांनी विद्यार्थ्यांसाठी सकाळी ६ ते ७.३० या वेळेत फिटनेस व योगा सत्राचे आयोजन केले. त्याचप्रमाणे, शिबिराच्या शेवटच्या दिवशी मुला-मुलींच्या धावण्याच्या स्पर्धांचा आनंद घेण्यात आला.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर, डॉ. शशिकांत मुंडे, डॉ. सुनील गायकवाड, प्रा. दिपक पगारे, प्रा. कुंदन कांबळे, प्रा. सुमेध माने, प्रा. निर्मला कांबळे यांचे मार्गदर्शन आणि शिबिरास आलेले कौतुक महत्त्वाचे ठरले. तसेच, स्थानिक समाजसेवक श्री. राजू मुंबईकर, श्री. मधुकर पारधी आणि सरपंच सौ. राधा पारधी यांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वीपणे पार पडले. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल करंजवकर यांच्या नेतृत्वाखाली, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सौरभ गुप्ता, ऋषिकेश सौंदाळकर, सागर बनसोडे, राहुल कोदुरुपाका, विजय कांबळे, आशिष जगताप यांनी देखील या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.
शिबिराच्या समारोपानंतर, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली गेली आणि यावेळी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानले गेले.
डॉ. विष्णू भंडारे
मुंबई प्रतिनिधी
