मात्र काथोड आणि अभिमन्यू यांचे आधी एकदा किरकोळ वाद झाले असल्यानं अभिमन्यू याला त्यांचा राग आला आणि त्यानं लाकडी दांडक्यानं काथोड भाग्यवंत यांच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या काथोड यांना आधी उल्हासनगरच्या शासकीय माध्यवरी रुग्णालयात, तिथून कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि तिथून सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी २७ मे रोजी काथोड भाग्यवंत यांचा मृत्यू झाला.
यानंतर पोलिसांनी अभिमन्यू भाग्यवंत याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे. मलंगगड परिसरात सातत्यानं गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं या भागात एखाद्या स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची गरज यानंतर व्यक्त होते आहे.
