अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाणी
एकीकडे धुळे महानगरपालिका नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी मोठमोठ्या योजनांच्या वल्गना करीत आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांना नऊ ते दहा दिवसाआड पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नागरिकांनी पाण्यासाठी लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेला धारेवर धरल्यानंतर अखेर अग्निशामक बंबाच्या सहाय्याने याभागात पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळाले.
तर नागरीक छेडतील आंदोलन
एका अग्निशामक बंबने किती नागरिकांची तहान भागणार असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. येणाऱ्या काळात जर दोन ते तीन दिवस पाणी नागरिकांना मिळाले नाही; तर धुळे महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू अशा संतप्त इशारा नागरिकांनी दिला आहे.
