राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. तरीही महापालिकेकडून कोणतीही मोठी कारवाई केली जात नव्हती. मनपाचे तत्कालीन उपायुक्त संतोष वाहुळे व मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या कार्यकाळात महापालिकेकडून प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाईची मोहीम हाती घेऊन सुमारे ३ लाखांचा दंड देखील वसूल केला होता. मात्र महापालिकेने प्लास्टिक वापरणाऱ्या कानाडोळा केल्याचे दिसून आले. आता आयुक्त विद्या गायकवाड यांनी कार्यभार घेतल्यानंतर प्लास्टिक निर्मिती करण्यासोबत विक्री व वापरणार यावर धडक कारवाई सुरू केली आहे
५० टन प्लास्टिक जप्त
महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरात अनधिकृतपणे प्लास्टिक वापरणारे व प्लास्टिक तयार करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवडाभरात मनपा प्रशासनाकडून ५० टन प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला असून एमआयडीसीमधील प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या दोन कंपन्यादेखील सील करण्यात आल्या आहेत.
