गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. या मालमत्तेचे एकूण मूल्य ५ कोटी ७५ लाख इतके आहे. यामध्ये लोणावळ्यातील बंगला, जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे. ही मालमत्ता १० दिवसांत खाली करावी, असे ईडीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसे न केल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता आहे. तसे न केल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या केल्या जातील, असा इशाराही ईडीने दिला आहे. तसेच संबंधित मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी देऊ नये, असेही नोंदणी महानिरीक्षक आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. या मालमत्तांचे २५ मे २०२२ रोजी ॲडज्युडिकेशन झाल्यानंतर ३० मे रोजी या मालमत्ता रिकाम्या करण्याची नोटीस ईडीने जारी केली. या नोटिशीनुसार, या जागा रिकाम्या झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईपर्यंत या मालमत्ता पूर्णपणे ईडीच्या ताब्यात राहतील.
माझी नव्हे तुमची घरी बसण्याची वेळ आलीय'
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खानदेशात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सातत्याने संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या गिरीश महाजन यांना लक्ष्य केले होते. 'शिवसेनेला बेडूक म्हणणार्या भाजप नेते गिरीश महाजन यांनी आधी स्वत: ला सुधारावे, त्यानंतर पक्षाला सुधारावे. गिरीश महाजन मला काय म्हणतील घरी बसा. गिरीश महाजन यांचीच घरी बसण्याची वेळ आता आली आहे' असा टोला खडसे यांनी लगावला होता.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खानदेशात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सातत्याने संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या गिरीश महाजन यांना लक्ष्य केले होते. 'शिवसेनेला बेडूक म्हणणार्या भाजप नेते गिरीश महाजन यांनी आधी स्वत: ला सुधारावे, त्यानंतर पक्षाला सुधारावे. गिरीश महाजन मला काय म्हणतील घरी बसा. गिरीश महाजन यांचीच घरी बसण्याची वेळ आता आली आहे' असा टोला खडसे यांनी लगावला होता.
