सुहास कांदे यांचं मत रद्द? ते मत नेमकं कुणाला?
शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द करण्यात आल्यानं त्यांनी मत नेमकं कुणाला देण्यात आलंय संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत यांना ४२ ते ४३ मतांचा कोटा निर्णय झाल्यानं संजय राऊत यांच्या विजयाला कसलिही अडचण नसल्याच समोर आलं आहे. तर, संजय पवार यांच्याकडे जाणारं पहिल्या किंवा दुसऱ्या पसंतीचं मत बाद होणार हे पाहावं लागणार आहे.
शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत रद्द करण्यात आल्यानं त्यांनी मत नेमकं कुणाला देण्यात आलंय संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत यांना ४२ ते ४३ मतांचा कोटा निर्णय झाल्यानं संजय राऊत यांच्या विजयाला कसलिही अडचण नसल्याच समोर आलं आहे. तर, संजय पवार यांच्याकडे जाणारं पहिल्या किंवा दुसऱ्या पसंतीचं मत बाद होणार हे पाहावं लागणार आहे.
सुहास कांदे यांचं मत बाद का झालं?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सुहास कांदे यांनी मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर ती घडी न घालता तशीच ठेवली असल्यानं त्यांचं मत रद्द करण्यात आल्याचं कळतंय.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार सुहास कांदे यांनी मतपत्रिकेवर मतदान केल्यानंतर ती घडी न घालता तशीच ठेवली असल्यानं त्यांचं मत रद्द करण्यात आल्याचं कळतंय.
हरियाणात भाजपचा आक्षेप फेटाळण्यात आला
हरियाणात देखील भाजपनं काँग्रेसच्या एका मतावर आक्षेप घेतला होता. तो आक्षेप देखील निवडणूक आयोगानं फेटाळला आहे. राज्यसभेच्या लांबलेल्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
हरियाणात देखील भाजपनं काँग्रेसच्या एका मतावर आक्षेप घेतला होता. तो आक्षेप देखील निवडणूक आयोगानं फेटाळला आहे. राज्यसभेच्या लांबलेल्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतमोजणीला सुरुवात होणार
राज्यसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं आलेले आक्षेप फेटाळले आहेत. त्यामुळं महाराष्ट्र आणि हरयाणात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्णय देण्यासाठी इतका वेळ लागला यावरुन निर्णय कशा प्रकारे झाला असेल तो पाहावा, असं म्हणाले. तर, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मला निवडणूक आयोगाच्या निर्णयाची माहिती घेतो, असं म्हटलं. लोकशाहीत मत बाद करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला न्यायदेवता आहे, न्यायालय आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीकडे अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे.
राज्यसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं आलेले आक्षेप फेटाळले आहेत. त्यामुळं महाराष्ट्र आणि हरयाणात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्णय देण्यासाठी इतका वेळ लागला यावरुन निर्णय कशा प्रकारे झाला असेल तो पाहावा, असं म्हणाले. तर, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मला निवडणूक आयोगाच्या निर्णयाची माहिती घेतो, असं म्हटलं. लोकशाहीत मत बाद करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला न्यायदेवता आहे, न्यायालय आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीकडे अधिक संख्याबळ आमच्याकडे आहे.
