मावळातील युवा शेतक-यांची जळगावच्या केळी विक्रेत्याने केली फसवणुक; कृषी विभागाने घेतली दखल

फुले शाहू आंबेडकर
0
मावळ : भाताचा आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात तरुण  शेतकऱ्यांनी  आपण काही वेगळा प्रयोग केला पाहिजे. म्हणून जळगाव येथून हजारोंच्या संख्येने केळीचे रोपे आणली. मात्र ती रोपे बोगस निघाली. केळीचे झाडे मोठी तर झाली मात्र त्याला केळीच आली नाही. त्यामुळे मावळातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली. 
टाकवे येथील बाबाजी गायकवाड यांचे पंधरा लाखाचे तर भोयरे गावाचे काळूराम भोयरे यांचे बारा लाखाचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांनी मावळ तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे रितसर G-9 या जळगांवच्या केळी विक्रेतेच्या विरोधात दाद मागितली आहे. या तक्रारीनंतर कृषी अधिकारी यांनी या बागेचा पंचनामा केला आहे.
मावळ तालुक्याला निसर्गाने भरभरून दिला आहे. मावळात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते म्हणून याला भाताचे आगार म्हटले जाते. आता मात्र वेळेवर मजूर मिळत नाही तर अवकाळी पावसाने भात शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने आपण काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे म्हणून तरुण शेतकरी बाबाजी गायकवाड आणि काळूराम भोईर यांनी साडे चार एकरावर केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाववरून पाच हजार केळीची रोप आणली.
या शेतक-यांनी आपल्या शेतात केळीची बाग फुलविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता आठव्या महिन्यात फळ धारणा होऊन दहाव्या महिन्यात केळी विक्रीसाठी मार्केटमध्ये जातात परंतु दीड वर्ष होऊन गेले तरी या बागेतील केळीची वाढ झालीच नसल्याने जळगाववरून आणलेली केळीचे रोपे बोगस असून आपली फसवणूक झाल्याने शेतकरी हवालदिल झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default