वाशीमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेच्या मुलीनं २ वर्षांपूर्वी आत्महत्या केली. २०१९ मध्ये आई मुलीसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली होती. दोघी नवसाच्या रांगेत आठ तास उभ्या होत्या. यावेळी मुलीचा तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला. त्याच दिवशी मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. आता आईनं लालबागच्या राजाला एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र पापण्यांच्या कडा ओलावणारं आहे.
२०१९ मध्ये लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी ८ तास उभे राहिलो होतो. रांग जराही पुढे सरकत नसल्यानं माझ्या मुलीचे पाय खूप दुखत होते. त्यामुळे मुलगी त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डसोबत बोलायला गेली. तिथे त्यानं तिच्या मनाला लागेल असं काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तर दिलं. ते ऐकून माझ्या मुलीनं मला घेतलं आणि रांगेतून बाहेर निघून दर्शनासाठी न थांबता घरी निघालो. माझ्या मुलीचं मानसिक संतुलन त्या दिवशी बिघडलं आणि तिनं संध्याकाळी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं,' असं आईनं बाप्पाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
