दोन आरोपींपैकी एक आरोपी हा स्वतःच्याच पत्नीकडून वैश्याव्यवसाय करुन घेत होता. पत्नीला बळजबरीने वैश्याव्यवसायात ढकलल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे. मानवी तस्करी (प्रतिबंध) या कायद्याचे कलम लावून आरोपींना न्यायालयाच्या समोर उभे केले जाणार आहे.
आजवर अनेक चित्रपटांमधून वेश्या व्यवसाय, त्यात इच्छेविरुद्ध अडकलेल्या मुली, त्यांना सहन करावा लागणारा त्रास दाखविण्यात आला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिस्थितीची दाहकता अनुभवली असेल. परंतु या मुलींना प्रत्यक्षात जो त्रास सहन करावा लागतो त्याचा आपण विचारही करू शकत नाही. या मुलींसाठी अनेक संस्था काम करता. अशीच एक संस्था आहे रेस्क्यू फाउंडेशन. त्रिवेणी आचार्य यांनी आपल्या पतीला सोबतीला घेऊन २००० साली या संस्थेची स्थापना केली होती. त्रिवेणी आचार्य यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आजवर ५ हजारपेक्षाही जास्त मुलींना सोडवलं आहे.
