कळमसरे (ता. अमळनेर येथील मुळचे रहिवासी असलेले महाजन (माळी) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्ताने हिंगोणे येथे स्थायिक झाले आहे. महाजन कुटुंबातील अक्षय संजय महाजन (वय १०) हा मुलगा मकरसंक्रांत असल्याने सकाळपासूनच पतंग उडवत होता. परंतु, पतंग उडविताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा पाचवीत शिकत होता.
मुलाच्या दुर्देवी मृत्यूने कुटूंबासाठी काळी संक्रांत; पतंग उडविणे पडले महागात
सोमवार, जानेवारी १६, २०२३
0
जळगाव : मकरसंक्रांत असल्याने लहानांपासून मोठ्यापर्यंत पतंग उडविण्याची हौस पुर्ण केली जाते. परंतु, ही हौस महागात पडली आहे. पतंग उडवित असताना दहा वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना हिंगोणे (ता. धरणगाव येथे आज घडली.
Tags
