याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीमध्ये काम न करता शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खडकी येथील तत्कालीन दोघा सरपंचांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला तर ग्रामसेवकांची वेतनातून अपहरणाची रक्कम वसूल करण्याची कारवाई पंचायत समितीने केली आहे. या कारवाईचा गाव कारभारी असलेल्या सरपंच व ग्रामसेवकांनी चांगलाच धसका घेतला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी तीन वर्ष केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नेमका प्रकार काय?
मालेगाव तालुक्यातील खडकी या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सुमारे ८० लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. वेगवेगळ्या चार खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली होती. मात्र हा निधी खर्च न करता परस्पर काढून घेण्यात आल्याने माहिती अधिकारी कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी त्याविरुद्ध लढा उभारला.
निधी खर्चाची कागदपत्रे मिळाली नाही
८० लाख रुपयांच्या निधी खर्चाची योग्य ती कागदपत्रे मिळून न आल्यामुळे लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर तत्कालीन सरपंच अर्चना देवरे व प्रतिभा सूर्यवंशी यांच्या मालमत्तेवर अपहारित रक्कमेपैकी ३९ लाख ४२ हजार ४८० रुपयांचा बोजा चढविण्यात आला.
ग्रामसेवकाच्या मासिक वेतनातून रक्कम वसुली
